📌केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजनेला दिली मंजूरी 📌 सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ 📌 जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचा-यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल. 📌नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे 📌 कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल 📌सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे. मात्र यापुढे केंद्र सरकार 18 टक्के हिस्सा असेल. 📌 जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50 टक्के नक्कीच मिळेल. 📌 पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळते. 📌 सरकारी तिजोरीवर पहिल्या वर्षी 800 कोटींचा बोजा पडणार 📌 त्यानंतर सुमारे 6000 कोटींचा बोजा पडणार आहे 📌 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल.
0 Comments